[%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF %E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80 %E0%A4%8F%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%9D%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E2%80%8E%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%B0 %E2%80%98%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE %E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B2039039 %E0%A4%B6%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF %E0%A4%AA%E0%A4%A3 %E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80 %E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A7%E2%80%8E %E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8 %E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE
बांभोरी-निमखेडी गावाला जोडणाऱ्या ‎पुलासोबत बंधाऱ्याला प्रशासकीय मान्यता‎ मिळाली होती; परंतु तांत्रिक कारण देत‎पीडब्ल्यूडीने केवळ पुलाचे काम सुरू केले.‎यामागे वाळूमाफियांचा दबाव होता, अशी‎चर्चा होती. आता गिरणा नदीवरच बांभोरी‎ पुलाला समांतर नवीन पुलाची निर्मिती‎‘न्हाई’कडून होणार आहे. त्यासाठी निविदा‎प्रक्रियाही राबवली जाते आहे. या ठिकाणी‎देखील पूल वजा बंधारा बांधणे शक्य‎ असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे; परंतु आता‎ देखील पुन्हा वाळूमाफियांच्या दबावामुळे‎‘न्हाई’कडून केवळ पुलाचे डिझाइन तयार‎ केल्याचा संशय व्यक्त होतो आहे.‎ यानिर्णयामुळे केवळ पूल बांधल्यास वाहतूक‎ सुधारेल; पण पाणी व पर्यावरणाचा मूळ प्रश्न‎कायम राहणार आहे. शिवाय शहर‎सौंदर्यीकरणाची संधीही हातून जाईल.‎ गिरणा नदीत बांभोरीजवळ सध्या‎अस्तित्वात असलेल्या पुलावरून 1979 मध्ये ‎वाहतूक सुरू झाली. या पुलाच्या उभारणीला‎ सुमारे 47 वर्षे पूर्ण झाले आहेत. गिरणा‎ नदीपात्रातून गेल्या अनेक वर्षांपासून बेसुमार‎ वाळू उपसा झाल्यामुळे नदीपात्र 15 ते 20 फूट‎खोल गेले आहे. यामुळे सध्याच्या जुन्या‎ पुलाच्या पायाला मोठा धोका निर्माण झाला आहे. जर नवीन ‎पुलासोबत बंधारा बांधला, तर‎ नदीपात्रात पाण्याची पातळी टिकून‎ राहील आणि वाळू उपशावर ‎नैसर्गिक निर्बंध येतील असा‎मत प्रवाह आहे. निमखेडीजवळ ‎पुलासोबत बंधाऱ्याला मंजुरी मिळाली होती; परंतु राजकीय‎ इच्छाशक्ती कमी पडल्याने पाणी‎ आडवा पाणी जिरवा कागदावरच‎ राहिले. पूल कम बंधारा करण्यासाठी‎ जळगावातील वेगवेगळ्या क्षेत्रातील ‎नागरिकांनी एकत्रित येत समितीच्या‎ माध्यमातून पाठपुरावा केला होता.‎ वाहतूक आणि पाणी प्रश्न‎सुटेल बांभोरीजवळ नवीन ‎पुलाच्या तांत्रिक आराखड्यात‎ बदल करून बंधारा समाविष्ट केला,‎तर एकाच खर्चात जळगावच्या‎ वाहतूक आणि पाणी अशा दोन्ही ‎समस्या सुटू शकतात. त्यामुळे आता‎ स्थानिक लोकप्रतिनिधींनी यासाठी‎ पाठपुरावा करणे आवश्यक आहे.‎ वाढीव निधीसाठी पाठपुरावा‎ न्हाई’ने सध्याच्या 79 कोटींच्या ‎निधीतून नवीन पुलाची उभारणी,‎ जुन्या पुलाची दुरूस्ती, शहरातील ‎महामार्गाचे व्हाईट टॉपींगला मंजुरी ‎दिली आहे. परंतु पुलासोबत बंधारा‎ बांधल्यामुळे शहराला फायदा होणार‎असेल तर वाढीव निधीसाठी केंद्रीय‎मंत्री नितीन गडकरींकडे पाठपुरावा‎ करणार. – स्मिता वाघ, खासदार,‎जळगाव लोकसभा मतदार संघ.‎ डिझाईनचा अभ्यास करणार‎ गिरणा नदीवर बांभोरीजवळ नवीन‎पुलाचे डिझाईन तयार झाले आहे.‎त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे;‎परंतु जळगावच्या विकासात भर‎पडणार असेल तर डिझाईनचा‎ अभ्यास करून काय बदल करता‎ येईल याबाबत वरिष्ठ कार्यालयाशी ‎संपर्क करणार. पुल कम बंधारा‎ उभारण्यास पाठपुरावा करू. -‎भाऊसाहेब साळुंखे, प्रकल्प ‎संचालक, न्हाई.‎ मानवी हस्तक्षेप टाळण्यासाठी व पारदर्शकतेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा ‎वापर करण्यात येत आहे. भरती प्रक्रिये दरम्यान गैरप्रकारांना आळा‎ घालण्यासाठी संपूर्ण मैदानावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर आहे. तसेच ‎वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली सर्व चाचण्या होत ‎आहे. उंची व छाती मोजण्यासाठी हैदराबाद येथून टाइम कंपनीचे चेस्ट ॲण्ड‎हाईट मशिन आणण्यात आले होते; मात्र प्रत्येक उमेदवारासाठी 4 मिनिटांचा‎ अवधी लागत असल्याने म्यॅनुअली मोजमाप केले. दरम्यान, दलाल “मी‎तुमची पोलिस भरतीत निवड करून देतो//” असे खोटे सांगून पैशांची मागणी‎करण्याची किंवा इतर कोणत्याही प्रकारचे आमिष दाखवण्याची शक्यता‎आहे. उमेदवारांनी अशा कोणत्याही भूलथापांना किंवा आमिषाला बळी पडू‎नये असे आवाहन पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी केले आहे.‎ यासाठी पूल वजा बंधारा गरजेचा?‎ 1. बंधाऱ्यामुळे गिरणेच्या पात्रात पाणी‎साठवता येईल. विद्यापीठ, बांभोरी, सावखेडा,‎आजूबाजूच्या 5 ते 7 गावांना पिण्याच्या‎पाण्यासाठी फायदा होईल.‎
2. नदीत पाणी अडवल्यामुळे परिसरातील‎विहिरी आणि कूपनलिकांच्या पाणी पातळीत‎मोठी वाढ होऊन सिंचनाचा प्रश्न सुटेल. तसेच‎वाळू उपशावर हा एकमेव तोडगा असेल.‎
3. पुलाखाली पाणी साठल्यास शहराच्या‎सौंदर्यात भर पडेल. रिव्हर फ्रंट किंवा पर्यटन‎केंद्र विकसित होईल. गिरणा पंपिंगच्या जागेत‎उद्यानासाठी पाच कोटी रुपये मंजूर आहेत.‎ यामुळे वाळू उपसा रोखता येईल‎ निमखेडी गावाजवळ शासनाने ‘पूल कम बंधारा’‎ला मंजुरी दिली होती; परंतु त्या ठिकाणी 40 कोटी‎रुपयांतून केवळ पूल होत आहे. याच परिसरात‎बलून बंधाऱ्याची चर्चा गेल्या 20 वर्षांपासून सुरू‎आहे; परंतु त्याचाही निर्णय नाही. आता गिरणा‎नदीवर नवीन पूल उभारला जाणार आहे तर तो‎केवळ पूल न राहता बंधाऱ्यासह उभारावा. देशात‎व राज्यात अनेक ठिकाणी पुलासोबत बंधारा‎अथवा बॅरेज उभारले आहेत. तंत्रज्ञानाचा उपयोग‎केल्यास जळगावजवळ अशी व्यवस्था करणे‎शक्य आहे. यासाठी सध्याच्या निधीत आणखी‎वाढ केल्यास बंधारा अस्तित्वात येऊ शकतो.‎अशा प्रकारचे अनेक प्रकल्प राबवले गेले आहेत.‎त्याचा पुढच्या पिढीला फायदा होईल. शिवाय‎जळगाव शहराच्या सौंदर्यात भर पडेल. तसेच‎वाळू उपसा देखील सहज रोखता येईल. दरम्यान,‎केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे पूल कम बंधारा‎संदर्भात धोरण आहे. पूल कम बंधाऱ्यामुळे पाणी‎अडवा पाणी जिरवा अभियानाला बळकटी‎मिळेल . शिवाय पर्यावरणाचा होणारा ऱ्हास‎रोखण्यास मदतच होणार आहे.‎ कंपनी म्हणते, बंधारा शक्य‎ बांभोरी येथील गिरणा नदीच्या जुन्या पुलाची‎उभारणी करणारे पी. सी. शहा डेव्हलपर्स‎लिमिटेडचे भावेश शहा यांनी नवीन पुलासोबत‎बंधारा उभारणे सहज शक्य असल्याचे‎सांगितले. यासाठी जुन्या पुलाला जोडून नवीन‎पुलाचे बांधकाम करावे लागेल. नवीन पुलाची‎पायाभरणी करताना पाइल फाउंडेशन किंवा वेल‎फाउंडेशनचा पर्याय आहे. त्यासाठी काँक्रीट बिम‎तयार करून भिंत उभारून पाणी अडवता येईल.‎यासाठी थोडा खर्च वाढेल; परंतु त्याचा फायदा‎अनेक वर्षांपर्यंत होईल. सौंदर्यीकरण, शाश्वत‎जलस्रोत उपलब्ध होईल असे सांगितले.‎
https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/jalgaon/news/girna-river-bridge-bandhara-nhai-sand-mafia-jalgaon-137185095.html