पुणे:
उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढली आहे. पूर नियंत्रणासाठी धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदीपात्रात सुरू असलेल्या विसर्गमध्ये वाढ करण्यात आली आहे.
आज, १ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ७:०० वाजता उजनी धरणातून भीमा नदी पात्रात ९०,००० क्युसेक एवढा विसर्ग सोडण्यात आला आहे. पाण्याची आवक पाहता या विसर्गात गरज पडल्यास आणखी वाढ होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.
नागरिकांना प्रशासनाचे आवाहन:
- नदीपात्रात नागरिकांनी कोणत्याही कारणास्तव उतरू नये.
- नदीपात्रातील पंप, साहित्य किंवा जनावरे असल्यास ती तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवावीत.
- नदीकाठच्या सखल भागातील संबंधित नागरिकांनी योग्य ती खबरदारी व दक्षता बाळगावी.
उजनी धरण व्यवस्थापन विभागातर्फे नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.




















